सांगली जिल्ह्यातील प्रेरणादायी उपक्रम !
पांडोझरी येथील अनोखा उपक्रम, ग्रामस्थांचा व पदाधिकाऱ्यांचचे लाभले सहकार्य.!
सांगली ( शालेय वृत्तसेवा ) :
जत तालुक्यातील पांडोझरी येथील बाबरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेने परिसर व मायाक्का देवस्थानाच्या जागेवर १ हजार ५० वृक्ष लागवड करून पर्यावरण पूरक उपक्रम राबिवला आहे.पर्यावरण समृद्धीचा संदेश दिला आहे.
पूर्व भागातील पांडोझरी येथील बाबरवस्ती जिल्हा परिषद शाळा द्विशिक्षकी आहे.आय.एस.ओ. मांनाकीत शाळा आहे.विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञाना सोबतच जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविले आहेत. यातूनच विद्यार्थी स्वतःच्या परिसरातील समस्यांचे निराकरण ,पर्यावरणासंदर्भात स्वतःची जबाबदारी, चिकित्सक विचार करण्यास शिकतात.
शिक्षक दिलीप मारोती वाघमारे यांचे मूळ गाव बोळेगाव (ता.बिलोली, जि.नांदेड) आहे.दरवर्षी वृक्ष संवर्धनासाठी उन्हाळी सुट्टीत गावी जात नाहीत.फक्त आठ ते नऊ दिवसाची सुट्टी घेतात. मुलांना शाळेत नियमित हजेरी लावण्यासाठी प्रोत्साहित केले.वेगवेगळे उपक्रम राबिवले.पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती व शैक्षणिक गुणवत्ता विषयी अनोखा उपक्रम राबिवला.
वृक्षारोपण व संवर्धन उपक्रम अंतर्गत शाळा परिसर, मायाक्का देवस्थान जागेवर व शेतकऱ्यांच्या बांधावर १ हजार ५० झाडांची लागवड केली आहे.मायाक्का देवस्थानाच्या एकर जागेवर ७०० झाडे व शाळेच्या आवारात ३५० झाडे लावली आहेत.यामध्ये कडुलिंब,बहावा,चिंच,पिंपळ,वड,कवठ,महारुख,काशीद,बेल,अजीर,रिठा,पिंपरण,आपटा,चिक्कू,आंबा,अशोक,संकेश्वर,आवळा,सिताफळ,सप्तपर्णी,पायर तसेच फळा फुलांची ही रोपे लावली ही झाडे लावली आहेत.
प्रत्येक विद्यार्थीना घरी ४ झाडें दिली आहेत.विद्यार्थी व पालकांना वृक्षाचे महत्व पटवून देऊन त्यांना प्रोत्साहित केले.संवर्धनाचे महत्त्व पटवून देवून झाडे लावली आहेत.
सध्या शाळेला उन्हाळी सुट्टी आहे सकाळी ६ते ८ वाजेपर्यंत सर्व झाडांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी शिक्षक दिलीप वाघमारे, ,पालक निंगाप्पा वज्रेशट्टी,राजू गडदे-मिस्त्री,गुलाब गडदे,प्रकाश बाबर,आप्पासो गडदे, दत्तात्रय कोरे, दत्तात्रय बाबर,तानाजी कोकरे, राहुल गडदे, आकाश गडदे शाळेतील सर्व विद्यार्थी विश्वजीत कोरे,सुरज बाबर, कार्तिक गडदे,तेजस गडदे,वेदीका गडदे, सर्वेश बाबर, तेजस्विनी घडले, विनायक मोटे,निवास घडले,लावण्या गडदे, पाणी पाजतात. झाडांची जोपासना करतात.
झाडांना राजाराम केरुबा गडदे या शेतकऱ्यांनी शाळेसाठी पाणी दिले आहे. सयाप्पा मोटे-पुजारी, गुलाब गडदे,तुकाराम बाबर यांनी वृक्ष संवर्धनसाठी मदत करतात. पर्यावरण उपक्रमाला सह्याद्री देवराईचे सयाजी शिंदे विशेष मार्गदर्शन तसेच गटशिक्षणाधिकारी रतिलाल साळुंखे , केंद्र प्रमुख रामचंद्र राठोड, शाळा व्यवस्थापन समिती ज्योती कोरे यांचे सहकार्य मिळतो,
या उपक्रमासाठी जालिहाळ बुद्रुक (ता.जत) येथील येराळा प्रोजेक्ट्स सोसायटीचे प्रमुख नारायण देशपांडे, कोल्हापूर येथील सचिन मिरजकर यांनी सहकार्य केले. रोपे, जाळी, बांबू,ड्रिप,पाईप,काळी माती, पुरविली आहेत.
शाळेला व्यसनमुक्ती पुरस्कार :
शाळेत विद्यार्थांच्या मदतीने व्यसनमुक्ती जनजागृती व प्रबोधन करुन पालकांनी पान तंबाखू, मावा,गुटखा,दारु,ध्रुमपान यापासून ४०पालकांना व्यसनमुक्ती केली आहे. या व्यसनमुक्ती उपक्रमची दखल घेऊन महाराष्ट्र शासन व सलाम मुंबई यांच्या संयुक्त सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना व्यसनमुक्ती पुरस्कार मिळाला.राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मासिकात व्यसनमुक्तीचा यशोगाथा प्रकाशित केले.
राष्ट्रीय पर्यावरण मित्र पुरस्कार :
राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था मुंबई यांचा बाबरवस्ती शाळेला राष्ट्रीय पर्यावरण मित्र हा पुरस्कार मिळाला आहे. हा कार्यक्रम रविवारी ५जूनला राळेगणसिद्धी (ता पारनेर, जि अहमदनगर) येथे होणार आहे. हा पुरस्कार जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते दिला जाणार आहे.
बाबरवस्ती वृक्षारोपणाचे परिसरात विशेष कौतुक
शाळेतील विद्यार्थिनींनी झाडांसाठी जीवामृत बनवून जीवामृत हे सहज व सुलभ बनविता येणारे मिश्रण आहे. नावाप्रमाणेच ते झाडांसाठी आणि सर्व प्रकारच्या पिकांसाठी अत्यंत पोषक असते. विद्यार्थी स्वतःहून नवनवीन कौशल्य आणि ज्ञान मिळवत असल्याचा आनंद आहे. जीवामृत तयार करून आठवडाभर भिजवून झाल्यावर जीवामृत घातले जातो.
जीवामृत, कोळसा,मल्चिंग, छिद्रांचा पाईप, कडधान्य, सूक्ष्म सिंचन इ. चा वापर करून केल्या जाणाऱ्या बाबरवस्ती शाळेचा वृक्षारोपण पद्धतीबद्दल शाळा व विद्यार्थ्यांचे परिसरात अभिनंदन व कौतुक केले.
भयानक दुष्काळ ओसाड माळरान अशा निरस वतावरणात, अवती भोवती शेळ्या मेंढ्याचा वापर पण या दुष्काळातही ज्ञानाचं नंदनवन फुलवणारे जिद्दी, परिश्रमी हे साध्य झाल आहे आमचे दिलीप वाघमारे यांच्या अथक परिश्रमातून बौद्धीक शिक्षणाचा प्रभाव विचारशक्तीवर तर मूल्य शिक्षणाचा प्रभाव विद्यार्थ्यांच्या हृदया वरती पाडणारे,आपल्या मौलिक अशा शैक्षणिक शैलीतून विध्यार्थ्यांना धारदार करणारे म्हणून शाळेचा विकास झाला.
- ज्योती कोरे
( शालेय व्यवस्थापन समिती बाबरबस्ती )
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .