पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :
मातृसेवा फाउंडेशन (ठाणे); यशो मंगल एज्युकेशनल कन्सल्टन्सी, (हिंगणघाट, वर्धा); श्री. विलास व्हटकर, मुंबई आणि शिक्षक ध्येय, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय 'कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२५' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज जागतिक महिला दिनानिमित्त या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.
राज्यातील महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती इतर सर्व नागरिकांना व्हावी, त्यांच्या कार्याला उत्तेजन देणे, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यातील ३४ महिलांना ‘कर्तृत्ववान महिला’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्कार प्राप्त महिलांमध्ये : प्रमिला भास्करराव आखरे (अमरावती); रेखा नामदेव गांगुर्डे, (नाशिक); डॉ. सुमाया रेशमा (ठाणे); कविता धन्यकुमार हिंगमिरे (सोलापूर); सौ. अंजली माणिक कुंदरगी (पुणे); शर्मिला शिवराम म्हादे (रत्नागिरी); सुनिता सुशांत सिकदार (गडचिरोली); सौ. संगीता तुळशीराम पवार (मुंबई); सायराबानू वजीर चौगुले (रायगड); उर्मिला साहेबराव शेळके (बुलढाणा); राखी संजय बेतवार (वर्धा); सौ. भारती सावंत (नवी मुंबई); लीलाताई राजेंद्र वसावे (नंदुरबार); श्रीमती निलीमा नितीनकुमार माळी (छत्रपती संभाजीनगर); श्रीमती सारिका सुभाष डोंगरे (बीड); उषा तम्मा कोष्टी (सोलापूर); अश्विनी सुभाष दीक्षित (बारामती); वर्षा सुरेशराव पवार (नंदुरबार); सौ. शितल आण्णासाहेब लोखंडे (सोलापूर); मनिषा नरेंद्र बोर्डे - कदम (अहिल्यानगर); श्रीमती सविता संदीप जगताप (मुंबई); परवीन फैसल खान (अहिल्यानगर) मोहिनी नारायण बर्डे - मराठे (छत्रपती संभाजीनगर); सौ. अजिता कुमठेकर (ठाणे); रूपाली मधुकर कराड/बोडके (नाशिक); शिल्पा हरिश जंगले – बोंडे (छत्रपती संभाजीनगर); श्रीमती सारिका अविनाश अहिरे (बुलढाणा); रंजना संजय चंद्रमोरे (मुंबई); मिनाज अशरफ आंजर्लेकर (रत्नागिरी); डॉ. मोनिका अशोक शिंपी (धुळे); मनिषा उत्तमराव थडवे (धाराशिव); सीता गोवर्धन घुले - वनवे (बीड); स्वाती अरविंद वानखडे (अमरावती); अपर्णा सुनील (ठाणे) यांचा समावेश आहे.
स्पर्धा यशस्वीतेसाठी मातृसेवा फाउंडेशनच्या संध्या सावंत (ठाणे), यशो मंगल एज्युकेशनल कन्सल्टन्सीचे मिलिंद दीक्षित (वर्धा); समाजसेवक विलास व्हटकर (मुंबई), शिक्षक ध्येयचे मधुकर घायदार; प्रभाकर कोळसे (वर्धा), कविता चौधरी, भाग्यश्री पवार, श्रद्धा पवार (जळगांव); वसुधा नाईक (पुणे), डी. जी. पाटील, विजय अहिरे, पुरुषोत्तम पटेल, (नंदुरबार); संजय पवार (रायगड); कैलास बडगुजर (ठाणे), राजेंद्र लोखंडे, सतिश बनसोडे (नाशिक); प्रेमजीत गतीगंते (मुंबई); एस. जी. कांबळे (लातूर); अर्चना भरकाडे, (यवतमाळ), दिवाकर मादेशी (गडचिरोली); सविता डाखोरे (सोलापूर); राजेंद्र चायंदे (अमरावती) आदींनी परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .