नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार किशोरभाऊ दराडे यांच्याकडे प्रहार शिक्षक संघटनेच्या मागणीला यश.
नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग मागील एक वर्षापासून प्राथमिक शिक्षणाधिकारी पद रिक्त होते. परिणामी शिक्षण विभागात अनागोंदी कारभार निर्माण झाला होता. याकडे महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेने चिंता व्यक्त केली होती. अखेर महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे श्री.भानुदास रोकडे नूतन प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात नुकतेच रूजू झाले.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात नियमित प्राथमिक शिक्षणाधिकारी मिळाल्याने प्रहार शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. श्री भानुदास रोकडे नूतन प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचा सत्कार पुष्पगुच्छ, शाल, पुस्तक, देऊन सन्मान करताना महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक संजय गावित, जिल्हा अध्यक्ष गोपाल गावित, दिलीप गावित रायगण माजी केंद्रप्रमुख नवापूर तालुका, शरद गावित केंद्रप्रमुख करंजी, अक्कलकुवा तालुका हंन्सारी एजाज, तळोदा तालुका अन्सारी रशीद अहमद, बालाजी जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभाग नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर श्री. सतीश चौधरी असताना शिक्षण विभागाची कामगिरी काळवंडलेली होती. पैसे देवाण-घेवाण करत असताना अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले होते. त्यांचेवर निलंबित होण्याची वेळ आली होती. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने श्रीमती वंदना वळवी यांचेकडे प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार सोपवला होता. त्यांचा देखील कारभार समाधान कारक नव्हता. यामुळे शिक्षक संघटना नाराजी व्यक्त करत होते.
नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभागात कायमस्वरूपी प्राथमिक शिक्षणाधिकारी मिळावा. यासाठी महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेच्या माध्यमातून नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार किशोरभाऊ दराडे यांच्या शिक्षक दरबार नंदुरबार येथे आयोजित कार्यक्रमात मागणी करण्यात आली होती. न्यायपूर्ण लढा दिला. न्याय लढ्याला अखेर यश आले आहे. प्रशासनाचेही आभार मानले आहे. नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभागात नवे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.भानुदास रोकडे म्हणून रूजू झाले आहे. त्यांच्या नवीन नियुक्तीमुळे जिल्हा परिषद शिक्षण विभाग भ्रष्टाचारापासून मुक्त होणार, असा आशावाद महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्यातील शिक्षण सेवा गट अ प्रशासन शाखेमधील तत्सम पदावर कार्यरत असणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांची शिक्षणाधिकारी प्रशासन शाखा वर्ग एक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे या पदोन्नतीमध्ये नंदुरबार जिल्ह्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. भानुदास रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. मागील एक वर्षांपासून नंदुरबार मध्ये केवळ प्रभारी अधिकारी शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत होते. या शासन निर्णयामुळे अनेक वर्षांनंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाला स्वतंत्र शिक्षणाधिकारी प्राप्त झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागील एक वर्षांपासून केवळ एक अधिकारी प्राथमिक विभागांचा कार्यभार सांभाळत होते. शालेय शिक्षण विभागाच्या या शासन निर्णयामुळे नंदुरबार जिल्ह्यांमध्ये शिक्षणाधिकारी पदाची असणारी कमतरता दूर झाली आहे.
विशेष बाब नियुक्त झालेल्या या अधिकाऱ्यांनी यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यामध्ये काम पाहिलेले आहे. उप शिक्षणाधिकारी म्हणून अतिशय उत्कृष्ठ काम केले आहे. याकाळात त्यांनी प्राथमिक शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केले होते. विविध शैक्षणिक उपक्रमांच्या अंमलबजावणी मध्ये त्या अग्रभागी असतात. त्यांना उत्तम अनुभव आहे. प्रशासन व शालेय गुणवत्तापूर्ण शिक्षण या प्राथमिक विभागामध्ये शिक्षणाधिकारी श्री. भानुदास रोकडे यांना असणाऱ्या दीर्घ अनुभवाचा फायदा नंदुरबार जिल्ह्यातील वाडी, वस्ती, पाड्यातील दुर्गम भागातील शिक्षण विभागाला होणार आहे. त्यांच्या संवाद कौशल्याचा फायदा जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना होणार आहे.
महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच जिल्हयातील प्राथमिक स्तरावरील सर्व प्रलंबित प्रश्न नूतन प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. भानुदास रोकडे हे प्राधान्याने सोडवतील अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यार्थी, लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी, आपल्या कामावर निष्ठा ठेवून शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक बदलासाठी झटणारे शिक्षणाधिकारी श्री. भानुदास रोकडे अशी त्यांची ख्याती आहे. शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कमागिरीबद्दल आणि अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना मिळालेली नियुक्ती ही नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या शिरपेचातील अभिनंदनची विशेष बाब आहे. असेही मत जिल्हाध्यक्ष गोपाल गावित यांनी व्यक्त केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .