कोल्हापूर जिल्हा परिषद शाळातील 525 शिक्षकांचे पद रद्द.. संच मान्यतेच्या नव्या आदेशाचा फटका !

शालेयवृत्त सेवा
0



कोल्हापूर जिल्हा परिषद शाळातील 525 शिक्षकांचे पद रद्द.. संच मान्यतेच्या नव्या आदेशाचा फटका !


कोल्हापूर ( शालेय वृत्तसेवा ) :

सुधारित आदेशाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील सहावी ते आठवीच्या वर्गांना बसला आहे विषय शिक्षकांचे पदे मोठ्या संख्येने कमी होऊन अतिरिक्त ठरत आहेत 49 समाजशास्त्र विषय शिक्षक आत्ताच अतिरिक्त झाले आहेत



शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या संच मान्यतेच्या सुधारित आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील सुमारे 525 शिक्षकांचे पदे कमी झाले आहेत. जुन्या संच मान्यतेनुसार जिल्ह्यात गतवर्षी 7952 शिक्षक पदे मंजूर होती. सुधारित संच मान्यता आदेशानुसार यावर्षी 7427 पदे मंजूर झाल्याने 525 शिक्षक पदे कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.



सुधारित संचमान्यता आदेशात नवीन शिक्षक मंजूर होण्यासाठी विद्यार्थी संख्येत वाढ केले आहे त्याचा परिणाम शाळावर होत असून शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. या सुधारित आदेशाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील सहावी ते आठवीच्या वर्गांना बसला आहे. विशेष शिक्षकांची पदे मोठ्या संख्येने कमी होऊन अतिरिक्त ठरत आहे. 49 समाजशास्त्र विषय शिक्षक आताच अतिरिक्त झाले आहेत.



15 मार्च 2024 च्या नवीन संच मान्यता आदेशानुसार जिल्हा परिषदेने प्राथमिक शाळांची 2024 -2025 ची मंजूर व कार्यरत शिक्षकांची संख्या शुक्रवारी जाहीर केले आहे. सहावी ते आठवी या वर्गांना अध्यापन करणाऱ्या विशेष शिक्षकांचे गतवर्षीपेक्षा 273 पदे त्यानंतर पहिली ते पाचवी या वर्गांना अध्यापन करणाऱ्या अध्यापकांची 235 पदे व 17 मुख्याध्यापक पदे कमी झाले आहेत. ग्रामीण व डोंगरी भागातील कमी पटसंख्येच्या शाळांना या आदेशाचा मोठा फटका बसत आहे. 



नवीन संच मान्यतेचा फटका राज्यातील सर्वच शाळांना शिक्षकांना बसणार :


जिल्ह्यात फक्त जिल्हा परिषद शाळांची 525 शिक्षक पदे कमी झाले आहेत माध्यमिक शाळा खाजगी प्राथमिक शाळा महापालिका व नगरपालिका शाळांची ही नवीन सुधारित आदेशानुसार पदे कमी होणार आहेत. नवीन संच मान्यतेचा फटका राज्यातील सर्वच शाळांना शिक्षकांना बसणार आहे.




शिक्षण हक्क कायदा डावलून फक्त महाराष्ट्र शासनाने संच मान्यतेचे अन्यायकारक निकष जाहीर केले आहेत. त्याचा फटका ग्रामीण भागातील शाळांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. डोंगरी भागातील गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.


-प्रसाद पाटील राज्याध्यक्ष पुरोगामी शिक्षक संघटना




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)