शालेय पोषण आहार योजने अंतर्गत शाळेत मिळणार इडली पराठा !

शालेयवृत्त सेवा
0




खिचडी खाऊन कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना आता चवदार जेवण शाळेत मिळेल इडली, पराठा अन भगरही समितीच्या शिफारशी विष्णू मनोहर देणार सोयाबीन तेलाऐवजी सूर्यफुलपाककृतीचे प्रात्यक्षिक तेलाचा वापर करावा. आठवडाभर एकच खाद्यवस्तू देण्याऐवजी दोन दिवसांनी आहार बदलावा. उडीद-तांदळाची इडली रवा इडली, केशरी रवा इडली असे विविध प्रकार असावेत.

खाद्यपदार्थ कसे बनवायचे याचे व्हिडीओ समितीचे एक सदस्य व सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर स्वतः तयार करणार आहेत.

ते सर्व शाळांकडे पाठवून त्यानुसार खाद्यान्य तयार केले जातील.

मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) : 

शाळेत मिळणाऱ्या माध्यान्ह भोजनात फक्त खिचडी खाऊन कंटाळलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. आता खिचडीसोबतच इडली-सांबार, भगर, थालीपीठ, नाचणीचे सत्व आणि पराठाही मिळणार आहे तशी शिफारस राज्य सरकारने नेमलेल्या समितीने केली असून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्याचे स्वागत केले आहे.

माध्यान्ह भोजन हे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिले जाते. केंद्राने केली होती सूचना केंद्र सरकारने स्थानिक उपलब्ध होणारे अन्नपदार्थ व तृणधान्य यांचा समावेश या आहारात करावा, असे सुचविले होते. या पार्श्वभूमीवर, आरोग्य आहार आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची एक समिती शालेय शिक्षण विभागाने नेमली होती.

■ मल्टिग्रेन पराठ्यामध्ये चार प्रकारचे धान्य असावे सोबत पुदिना चटणी द्यावी. याशिवाय माध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या व्यक्ती, संस्थांच्या मानधनात वाढ करावी, असेही समितीने सुचविले आहे.


विद्यार्थ्यांना विविध पोषक तत्त्वे मिळावीत व भोजनात वैविध्य असावे यासाठी आमच्या विभागाने या क्षेत्रांतील मान्यवरांची समिती नेमलेली होती. समितीने अहवाल दिलेला आहे. त्यानुसार अपेक्षित असलेले बदल नक्कीच केले जातील.

- दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)