प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हा परिषद शाळा वाचवा अभियान..
छत्रपती संभाजीनगर ( शालेय वृत्तसेवा ) :
गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी जि. प. शाळा म्हणजे शिक्षण व्यवस्था आहे. या शाळा टिकविण्यासाठी शिक्षकांना समाजाच्या मदतीने पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी समाजानेही पुढे आले पाहिजे. शाळेतील गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शिक्षकांनाच अधिक कष्ट करावे लागेल, असे प्रतिपादन माजी मंत्री बच्चू कडू यांनी केले.
प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हा परिषद शाळा वाचवा अभियान राबविण्यात येत आहे, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष राजगुरू, अमोल तोंडे, राज्य समन्वयक विजय धनेश्वर, निवृत्ती जाधव, किसन गायके, सुधाकर शिंदे, कुणाल राऊत, संजय हेरकर, अमोल तोंडे, रवींद्र पांदे, तानाजी पाटोळे आदींची उपस्थिती होती. यावेळी संतोष राजगुरू, सचिव अमोल तोंडे, विजय धनेश्वर, निवृत्ती जाधव, किसन गायके यांनीही मनोगत व्यक्त केले. आभार प्रवीण वाघमोडे यांनी मानले.
...असे आहे अभियान
▪️प्रहार शिक्षक संघटनेने सुरू केलेल्या अभियानात जि. प. शाळांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
▪️त्यात स्वच्छतागृह, 3 संरक्षण भिंत, ग्रंथालय, पेयजल याकडे लक्ष देण्यात येत असल्याचे राज्य समन्वयक विजय धनेश्वर यांनी सांगितले.
जि. प. शाळांमध्ये आजही भौतिक सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. शिवाय विद्यार्थ्यांच्या वैध आधारमुळे शिक्षकांची संचमान्यता ही शाळेसाठी घातक ठरत आहे. विद्यार्थी शाळेत उपस्थित असतानाही संचमान्यतेमध्ये गृहीत धरला जात नाही. परिणामी, शिक्षक अतिरिक्त ठरत असून, गुणवत्ता कमी होत आहे. त्यामुळे 'प्रहार'ने अभियान हाती घेतले आहे.
- बच्चू कडू, माजी आमदार
जि.प. शाळाच गरीब विद्यार्थ्यांची शिक्षणव्यवस्था :
गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी जि.प. शाळा हीच शिक्षणव्यवस्था आहे. त्यामुळे या शाळा टिकल्या पाहिजेत. त्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे, असे आवाहन माजी आ. बच्चू कडू यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .