मराठी भाषा जोपासली पाहिजे- प्रा. डॉ. गुरुनाथ कल्याण

शालेयवृत्त सेवा
0

    



 नांदेड ( शरद जोगदंड ) :

मुखेड येथून जवळच असलेल्या ग्रामीण ( कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय वसंतनगर ता.मुखेड  येथे प्रसिद्ध कवी वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जन्म दिनानिमित्ताने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या वेळी  कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते  प्रा. डॉ.कल्याण गुरुनाथ म्हणाले, 'सर्वानी मराठी भाषा जोपासली, पाहिजे बोलली पाहिजे, मराठी  भाषा आपली मातृभाषा आहे. आपल्या दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर करणे अत्यावश्यक आहे. जेणेकरून मराठी भाषेचे संवर्धन होण्यास मदत होईल.  

मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. आपणास जितक्या सहजतेने मराठी भाषेत व्यक्त हाेते तितक्या सहज  इतर भाषा मधे व्यक्त हाेणे शक्य नाही. खरंतर आज मराठी भाषेऐवजी इंग्रजी भाषेला अधिक प्राधान्य दिले जाते. सर्वच भाषा जरी आवश्यक असल्या तरी आपले चिंतन , मनन,आचार,विचार व संस्कृती मराठी भाषेत असल्या कारणाने त्या भाषेची जपणूक करणे आपले कर्तव्य आहे .म्हणून ज्या साहित्यिकांनी आपले साहित्य लेखन करून मराठी भाषेला विकसित केले. अशा साहित्यकारांची आज आठवण करणे व त्याच्या साहित्याची जपणूक करणे आपले आद्य कर्तव्य आहे.


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य हरिदास राठोड म्हणाले की,' कुसुमाग्रज मराठी साहित्यातील फार मोठे साहित्य लेखन करणारे साहित्यिक आहेत. त्यांनी विविध  वाड़मय प्रकारांमध्ये आपला ठसा उमटविला आहे. म्हणून शासनाने २७ फेब्रुवारी हा दिवस "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा केला जातो. सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात मराठी भाषा जगवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असे प्रतिपादन अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य हरिदास राठोड यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभागाचे विभागाच्यावतीने करण्यात आले. 

प्रास्ताविक प्रा.डॉ. पंडित शिंदे यांनी केले.  या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ. कविता लोहाळे यांनी केले. तर आभार प्रा.अंगद जाधव यांनी मांडले.या कार्यक्रमास प्रा.अरुणा ईटकापल्ले, प्रा.सरोज गायकवाड, प्रा.किरण भिसे, प्रा.होनवडजकर व विद्यार्थी  मोठ्या संखेने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)