दहाविच्या विद्यार्थ्यांना दिला निरोप..
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
विज्ञान तंत्रज्ञानामुळे जग खूप जवळ आले पण माणूस माणसापासून दूर होतोय त्यामुळे विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. हेमंत कार्ले यांनी केले.
जिल्हा परिषद हायस्कूल वाघी येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना आयोजित निरोप समारंभात ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक सुरेश बादशहा तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच गणपतरावजी राठोड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव गिरी उपस्थित होते.
डॉ. कार्ले पुढे म्हणाले की, चांगल्या करिअरसाठी जसे खूप कष्ट घ्यावे लागतात तसंच चांगला माणूस होण्यासाठी ही जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. याप्रसंगी प्राध्यापक शंकर विभुते यांचेही महापुरुषाच्या विचारांची उपयुक्तता या विषयावर समायोचित भाषण झाले. यावेळी श्रीधर जोशी, ऋषिकेश डाके, प्राची हनवते, मुक्ता सूर्यवंशी, श्रेया भोसले, पायल, अंजली गिरी आदींनी मनोगत व्यक्त केले.
या भावपूर्ण निरोप समारंभात जयश्री वडगावकर, राजकुमार गोरे, विठ्ठल पवार, रावसाहेब देवकते, बालाजी क्षीरसागर, प्रलोभ कुलकर्णी, शिवानी शिरसागर, करुणा वाघोळे, स्मिता भोसले, तेजस्विनी आठवले, स्नेहल हिंगमिरे, पल्लवी मोरे, साक्षी निवडांगे, देवराव भोसले आदी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .