माध्यम ते मिडियम !
धावते जग आणि त्यामागे धावणारी शाळेतील चिमुकली मुले सकाळी उठल्यापासुनच लगबगीने सर्वांची तयारी आणि स्वंयंपाकाची डबे भरण्याची, वाहन पकडण्याची एकच घाई अस एक सामान्य चित्र आज सर्वच ठिकाणी दिसत आहे. रोज सकाळी निरागस गोड मुले वेगवेगळी गणवेश घालुन आपआपल्या शाळेच्या दिशेने धावपळ करत निघतात आणी मुले एकदाची गेली शाळेत म्हणुन पालक गृहीणी सुटकेचा निश्वास टाकतात.
जगभरात ज्ञानाचा, लोकसंख्येचा अफाट दळणवळणाचा, तंत्रज्ञानाचा विस्फोट होत आहे आणि सोबतच विस्फोट होतोय अजुन एका गोष्टीचा तो म्हणजे चिमुकल्या बालकांच्या सहनशक्तीचा. माध्यम, माध्यम म्हणजे काय ? सोप्या भाषेत आपण आपले विचार आपल्या भावना आपला संदेश ज्या मार्फत समोरच्या व्यक्तीला पोहचवितो तो मार्ग म्हणजे माध्यम होय. जेणे करुन आपण दिलेला संदेश केलेली अभिव्यक्ती समोरिल व्यकतीला निट सहज सोप्या पध्दतीने स्विकारुन यावर सुलभ विचार करता यावा आणी प्रतिसाद देता यावा एवढेच संप्रषणात अभिप्रेत असते. परंतु आज आपण प्रत्येक खेडोपाडी गावोगावी आणी शहराच्या तर प्रत्येक ठिाकणी इंगजी माध्यमाच्या शाळा पाहतो. आणी त्यात शिकणारी मराठी भाषेतुन विचार करणारी अगदिच लहान लहान बालके पाहतो.ज्यांची मातृभाषाच अजुन अपरिपक्व असते परंतु ते बोलण्यासाठी विचार करण्यासाठी किेबहुना सर्वंच गोष्टींसाठी मातृभाषेवर अवलंबुन असतो. अशातच त्याच्या विचारशक्तीला कल्पना विश्वाला एक खिंडार पाडण्याच काम केल जात आहे, आपल्या समाजातुन, पालकांकडुन. ते म्हणजे या बालंकांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत बळजबरी दाखल करुन. इंग्रजीला विरोध नाही आणि नसावाच, कारण ती आंतरराष्ट्रीय भाषा आहे. परंतु ज्यांची मातृभाषाच अजुन अपरिपक्व नाही, अशातच परिकीय भाषेच्या माध्यमातुन शिक्षणाची सुरुवात म्हणजे बालकांच्या सर्जनशिल अभिव्यक्तीला कुठेतरी अडथळाच म्हणावा लागेल.
इंग्रजी भाषा म्हणुन शिकणे आणी इंग्रजीतुन विषय शिकणे यातील मुळ फरक आपण समजुन घेतला पाहीजे. शिक्षण पाठांतर घोकंपट्टी ही कल्पना आता लयास गेली आहे. सर्जनशिल, रचनावादी ज्ञान हा शिक्षणाचा जर पायाभुत घटक बनला असेल तर त्यात कल्पकतेला विचारांना अनन्यसाधारण असे महत्व आहे. जो केवळ मनुष्य मातृभाषेतुनच करत असतो. परंतु केवळ इंग्रजीतुनच विषय शिकविले गेले, भरमसाठ फि भरली गेली, वेगवेगळया वाहनातुन लेकर नटुन थटुन गेली म्हणजे आपले पाल्य शिकत आहे असाही बऱ्यापैकी समज होतो आहे. आपल्याचा मातृभाषेतुन शिक्षण देताना कुठेतरी हीन भावना कमीपणाची भावना पालकांमध्ये पाहावयास मीळत आहे. आता विपर्यास होतो कुठे बघा, आपली मातृभाषा मराठी सर्व विषय इंग्रजी भाषेत आणी ज्या शाळेत अध्यापन केले जाते तेथे बहुतांशी हींदी भाषेचा वापर करुन इंग्रजी माध्यमाचे पुस्तक शिकविले जाते. असा क्रमरहीत, विचारहीन मिडियम चा बोजवार घेवुन जेव्हा मुले पुढे जात असतात आणि त्यावर पालकांच्या अपेक्षांच ओझ वाहत असतात. तेव्हा नकळतच ही मुले कधी आक्रमक बनतात तर कधी नैराष्याच्या आहारी जातात पण त्यावेळी वेळ ही निघुन गेलेली असते. मग यावर आताच थोडा विचार करणे क्रमप्राप्त ठरणार नाही का ?
संकल्पना समजणे आशय लक्षात घेणे त्यावर विचार होणे त्यातुन सृजनशिल वृतीला चालना मीळणे नव्या जुन्या ज्ञानाची सांगड घालणे आणी बालके ज्ञानरचनावादाची प्रतिके तयार होणे यासठी मराठी सारखे, मातृभाषेसारखे दुसरे माध्यम असु शकत नाही. अनेक थोर मानसशास्त्रज्ञ, शैक्षणिक विचारवंत ज्यांनी शिक्षणातील अनेक बारकावे अगदी जवळुन तपासण्यासाठी शिक्षण प्रक्रीयेचा वर्षानुवर्ष अभ्यास केला त्या सर्वानुमते शिक्षण केवळ मातृभाषेतच असावे असा निष्कर्ष आहे. शिक्षणासाठी एका विशीष्ठ अश्या भाषेचीच गरज असते असे नसते. मातृभाषा ही विचार प्रेरक शिक्षण प्रणालीचा आत्मा आहे. त्याला पर्याय नाही.
इंग्रजीचा विचार करता इंग्रजी ही अत्यंत महत्वाची समजली जाणरी, जागतिक स्तरावरील भाषा आहे. तिचे ज्ञान असणे अगत्याचेच आहे. परंतु इंग्रजीकडे केवळ भाषा म्हणुन पाहीले पाहीजे. जगातील सर्वात विकसित राष्ट्र म्हणुन ओळख असणारा जपान जेथिल शिक्षण प्रणली ही जगात सर्वोत्तम मानली जाते ते देखील आपल्या पिढिला मातृभाषेतुनच शिक्षण देतात आणि इंग्रजीचा बाउ न करता त्याकडे एक भाषा म्हनुण पाहतात. गरज आणि अटटहास यातील बारिक फरक लक्षात घेता आपण प्रत्येक वर्षी जाहीर होणारे MPSC आणी UPSC चे निकाल विचारात घेणे आवश्यक आहे. त्यात बहुतांशी निवड झालेले विदयार्थी हे मातृभाषेतुन शिक्षण घेवुन यशस्वी होताना आपल्याला दिसतात. प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धा आणी स्पर्धेतील प्रश्नांच्या कक्षा या स्मरण शक्तीवर नाही तर ज्ञानाचे आकलन उपयोजन यावर भर देतात. म्हणुन मातृभाषेतुन शिक्षणाचे महत्व यातुन आपल्याला सहज समजुन घेता येईल. अवगत नसणाऱ्या नविन भाषेतुन पाठांतर होवु शकते आणी पाठांतराच्या नियमित सवयीमुळे बालकांत शिक्षणाची गोडी निर्माण होण्याऐवजी हळुहळु त्यांना शिक्षण हे कृत्रिम व निरस वाटु लागते.
मातृ म्हणजे माता जी आपल्या जिवनाची प्ररेणास्थान असते, आपल्या आयुष्याचा मार्गदिप असतो. आणी जिथे प्ररेणा तिथे विचार, जिथे विचार तिथे कृती, जिथे कृती तिथे जिज्ञासा आणी जिथे जिज्ञासा तिथे शोध. या जिज्ञासेला आळा न घालता वाहु दया मोकळे तरच घडेल खरा ज्ञानरचनावाद. आपल्या पाल्याचा खचलेल्या विचार शैलीचा पाया रचन्यापेक्षा त्यांच्या स्वंतंत्र अभिव्यक्तीला मातृभाषेचे मोकळे आभाळ मिळु दया. पालक म्हणुन आपल्या बालकाचा, भाषा म्हनुन इंग्रजीचा आणि माध्यम म्हण्नुन मातृभाषेचा स्विकार केल्यास ज्ञानाचे व्दार आणी प्रगतीचे मार्ग आपल्या पाल्यांसाठी कायम खुले राहतील.
लेखिका : पुनेरथा भिमराव उमरे
( प्राथमिक शिक्षिका )
जि.प.के.प्रा.शा.चिखली(बु) ता. किनवट जि.नांदेड
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .