नांदेड ( शालेय वृत्तसेवा ):
जि.प.प्रा.शा.गणेशपूर (जुने) केंद्र कमठाला ता.किनवट येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला . प्रथम मोठ्या उत्साहात गावातून प्रभात फेरी काढण्यात आली .त्या नंतर राष्ट्रसंताच्या प्रतिमांचे पुजन करून ध्वजारोहण करण्यात आले व पंचप्रण शपत घेऊन तंबाखू मुक्त होण्यासाठी शपत घेतली त्यानंतर भारत विकसनशील करण्यासाठी शपत घेण्यात आली व जल्लोषात स्वातंत्र्य भारताचे नारे दिले.
सूत्रसंचालन शाळेचे मु.अ.श्री.प्रविण पिल्लेवार यांनी केले तर स्वागत गीत विद्यार्थिनीं पवित्रा चिक्राम,नम्रता आत्राम व वंशिका मेश्राम यांनी गाऊन पुढील भाषणाचा कार्यक्रम सुरू केला . पहिली ते चौथीपर्यंत चे विद्यार्थ्यी प्राची सोळंके,नम्रता आत्राम,वंशिका मेश्राम,रोहन आत्राम,तन्वेश मेश्राम,पवित्रा चिक्राम,रिया कोडापे ,श्रावणी कुमरे,संस्कृती कर्हाळे,वेदांत गाडे व अंशुमन गाडे यांनी सुंदर असे विविध विषयावर भाषण केली. गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यानां बक्षीस ही दिली आणी त्यांचे कौतुक केले .
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत चालु असलेला कार्यक्रम इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या माता पालक गटाच्या लिडर माता सौ रविता आत्राम ,सौ आनीता आत्राम व पुष्पा आत्राम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्या वेळी गावातील जेष्ठ नागरिक तुकाराम आत्राम ,कुडमते,माधव पेंदोर,चंद्रकला आडे,विजय मेश्राम,भावराव तोडसाम,संतोष तोडसाम,रविकांत कुमरे,संदिप गाडे ,पुजा कर्हाळे,पुजा बोखारे,कल्पना बावणे ,रविता आत्राम,तसेच अनेक गावकरी उपस्थित होते . शेवटी सर्वांना राजगीरा लाडू ,चाॅकलेट व केळी वाटप करण्यात आली . व स.शि .ऊर्मिला परभणकर यांनी निपुण भारत कार्यक्रमाची थोडक्यात माहिती सांगून आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता केली.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .