चंद्राचा मानवी मनावर परिणाम होतो की नाही ?

शालेयवृत्त सेवा
0

 



चंद्राचा मानवी मनावर परिणाम होतो की नाही ?


या आधीच्या पोस्ट मध्ये सांगितल्या प्रमाणे चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम माणसाच्या किंवा इतर कोणत्याही प्राण्याच्या शरीरावर होत नाही, 


केवळ भरती-ओहोटी च्या बाबतीत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात असलेल्या पाण्याच्या (पदार्थाच्या) large-small volume एकत्रित साठ्यानुसार कमी जास्त प्रमाणात चंद्राचे गुरुत्वाकर्षण Earth-Lunar average gravity effect प्रभाव टाकते. 


या पोस्ट मध्ये ठरविक चंद्राच्या कलेच्या वेळी मानवी मनावर काय परिणाम होतो किंवा नाही ? याचा उगम कसा झाला ? यावर माहिती बघू. 


अमावस्या - पौर्णिमा असताना माणसांना विचित्र अनुभव येणे किंवा अति उत्साही वाटणे 


हे केवळ मानसिक असून ह्याचा उगम / संबंध थेट आदिमानवाच्या काळात जातो. 


गुहेत राहणारा मानव केवळ दिवसा शिकार करायचा आणि रात्री जंगली प्राण्यांच्या पासून रक्षण व्हावे म्हणून गुहेत लपून बसायचा. 

हीच गुहा पुढे घर safe hiding place म्हणून बनली गेली. 


माणसे जसे टोळ्यांनी राहू लागले एकत्र शिकार करू लागले, त्यांच्याकडे चांगले भाले, दगडी शस्त्रे आली, आगीचा शोध लागला तेव्हा तसे लोक रात्री सुद्धा शिकारीला गुहा (घर) सोडून बाहेर जंगलात जाऊ लागले. 


चंद्र कला जशी वाढत जाते तसा चंद्राचा जमिनीवर पडणारा प्रकाश सुद्धा जास्त होत जातो आणि पौर्णिमेच्या आसपास सर्वात जास्त असतो. 


त्यामुळे पौर्णिमेच्या आसपास जंगलात जास्त चांगल्या प्रकारे माणसांना दिसू शकत असल्याने इतर प्राणांच्या कडून हमला होऊन भक्ष बनण्या ऐवजी माणसे सावध राहून स्वतः शिकार करू लागली आणि त्यामुळे पौर्णिमेच्या रात्री माणसांना सर्वात चांगली शिकार मिळू लागली. 


ह्याच कारणाने पौर्णिमा आणि वाढत जाणारा चंद्र कला म्हणजे चांगला - शुद्ध - शुभ (जास्त फल दायी) असे मानले जाऊ लागले जे आज सुद्धा आपण पंचांग, कॅलेंडर मध्ये बघतो. 


ह्यात अजून एक गोष्ट म्हणजे पौर्णिमे पर्यंत मानवाला शिकार मध्यरात्रीच्या आधीच मिळत असे कारण पौर्णिमेचा चंद्र सूर्यास्त झाल्यावर लगेच उगवून बराच वेळ रात्रीच्या आकाशात असतो. 

त्यामुळे पौर्णिमे पर्यंतच्या रात्रीत शिकार जास्त आणि लवकर मिळाल्याने माणसे समाधानी आनंदी होत. 


या उलट जेव्हा पौर्णिमे नंतर चंद्र कला कमी होत गेली तसे माणसांना चंद्र उगवे पर्यंत वाट बघत राहावे लागे नंतर सुद्धा थोडी शिकार मिळेल तशी करून चंद्र प्रकाश कमी होत जात असल्याने खूप उशिरा पर्यंत / पूर्ण रात्र थांबावे लागून शिकार कमी मिळत असे. 


जंगलातच कुठेतरी थांबावे लागे ज्यात वर सांगितल्या प्रमाणे इतर प्राणी हमला करून माणसांचीच शिकार होण्याचा धोका जास्त असे. 


त्यामुळे कृष्ण पक्ष - कमी होत जाणारा चंद्र अशुभ (कमी फल दायी) असे मानले गेले. 


शेवटी अमावस्या म्हणजे चंद्र रात्री उगवणार नाही (सूर्याच्या बरोबर उगवणार आणि मावळणार) त्यामुळे त्यावेळी शिकारीला सुट्टी. 


जोखीम जास्त अंधारात इतर हिंस्त्र प्राण्यांचा हमला होण्याची भीती कृष्ण पक्षात जास्त कारण इतर निशाचर प्राण्यांना माणसापेक्षा जास्त चांगले दिसते. 


असे सगळे आदी मानवाचे कथानक जीवनक्रम जे चंद्राच्या कले नुसार ठरवले गेले आणि पुढे माणसाचे मन म्हणजे चांगले वाईट घडणे हे सुद्धा चंद्र कलेच्या कमी जास्त होण्याशी जोडले गेले. 


प्रत्यक्षात त्याचा थेट असा काही संबंध आता नाही याचे कारण आताचा आधुनिक माणूस विज्ञान युगात राहतो ज्यात लाईट च्या सोयी मुळे रात्रीचा दिवस करून 24x7 काम चालू असते. 


त्यामुळे पूर्वीच्या काळ पासून मानवाच्या अनुभवाची नोंद  DNA मध्ये झाली.


त्यानुसार बनलेल्या शिकार अनुभव कथा यातून चंद्र प्रकाश बघून कामाला सुरुवात करावी, त्यात सुद्धा पौर्णिमा चांगली, अमावस्या वाईट असे ठोकताळे समजुती आजही सुरूच आहेत. 


ही पोस्ट जास्त मोठी झाली आहे त्यामुळे पौर्णिमा अमावस्या वेळी काही जण विचित्र वागतात किंवा तसे नाटक करतात की त्यांना कोणते मानसिक आजार असतात ? यावर माहिती नंतरच्या पोस्ट मध्ये बघू.


                   ( सौजन्य : आकाशातील गमती जमती )

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)